संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबई येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगुहावरील अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा कोपरगाव येथील बुद्धिस्ट यंग फोर्सने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
वर्तमामानात कोरोना विषाणूच्या साथीने कहर केलेला असताना मुंबईस्थित आंबेडकरी चळवळीचे स्मृतिस्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही असामाजिक तत्त्वांनी हल्ला करून सामाजिक ऐक्यास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.हि निश्चितच निषेधार्ह घटना आहे.या बाबत राज्य सरकारने या असामाजिक तत्वांचा शोध घेऊन त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव शहरातील बुद्धिस्ट यंग फोर्सने केली आहे.हा आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेवरच घाला असून हि बाब सरकारने गंभीरपणे घ्यावी,व या आरोपीना तातडीने अटक करावी,राजगुहाला संरक्षण द्यावे,आंबेडकर कुटुंबाला झेड सुरक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री,कोपरगावचे तहसीलदार यांना दिल्या आहेत.
निवेदनावर विजय त्रिभुवन,मनोज शिंदे,संजय दुशिंग,राहुल खंडीझोड,नितीन शिंदे,राजेंद्र पगारे,विशाल कोपटे, अशोक पगारे,चंद्रकांत पगारे गणेश पवार,नाना रोकडे आदींच्या सह्या आहेत.
Leave a Reply