कोपरगाव (प्रतिनिधी)
क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले की आज मोबाईलच्या अती वापरामुळे मुलं मैदानी खेळ विसरत चालले आहे.म्हणून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळल्याने आपले आरोग्य नेहमी निरोगी राहते. यानंंतर भारतीय आयर्विमा महामंडळाचे कार्यालयीन अधिकारी प्रमोद डोंगरे,यांनी पण विद्यार्थ्यांना खेळाबद्दल मार्गदर्शन केले. या उद्घाटन कार्यक्रमावेळी कोपरगाव येथील आयर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी,संस्थेचे प्राचार्य दिपक चौधरी, तसेच संस्थेचे संस्थापक केशवराव भवर आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
Leave a Reply