..या ठिकाणचा खंडोबा मंदिर”वर्धापण दिन”सोहळा रद्द 

..या ठिकाणचा खंडोबा मंदिर”वर्धापण दिन”सोहळा रद्द 

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी-(प्रतिनिधी)

संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेले व नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी म्हणून ओळख असलेल्या राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील खंडोबा मंदिराचा दि.१६ नोव्हेंबर रोजी होणारा वर्धापनदिन अर्थात भाऊबिज उत्सव यावर्षी कोरोना महामारी मुळे रद्द करण्यात आला आहे.शासनाच्या नियमांचे पालन करून गर्दी होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.

श्री.क्षेत्र वाकडी येथील भाऊबिज उत्सवास महाराष्ट्र राज्यातुन शेकडो भाविक व वाघे मंडळीचे ताफे येत असतात यावर्षी हा उत्सव होण्याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती.याबाबत अनेकजण संपर्क साधत होते.या वर्षीसाठी उत्सव रद्द झाल्यामुळे अनेक भाविक व वाघे मंडळीमधे नाराजी पसरली आहे.मात्र कोरोना सारख्या गंभीर आजारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाकडी येथील खंडोबाची जागरण गोंधळाची पारंपरिक प्रथा दरवर्षी सुरु आहे.या प्रथेला खंड पडू नये म्हणून यावर्षी फक्त एकच जागरण गोंधळ घट भरून हा उत्सव साध्या पध्तीने साजरा होणार आहे.सध्या कोरोनामुळे सर्वत्र देवस्थान बंदच आहे.या काळात भाऊबीज उत्सव देखील यावर्षीसाठी रद्द करण्यात आला असून भाविकांनी घरी राहूनच पूजा करुन घट भरावे मंदीर परिसरात निदान यावर्षी तरी कोणी भाविकांनी घट भरण्यास येऊ नये असे खंडेराय मंदिर वर्धापन सोहळा,भाऊबीज उत्सव सोहळ्याचे आयोजक कै.रामनाथबाबा कोते यांचे सुपुत्र दत्तात्रय रामनाथ कोते यांनी जाहीर केले आहे.भाऊबीजच्या दिवशी वाकडी येथील खंडेराय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामनाथबाबा कोते यांनी केली आहे.त्या दिवसापासून दर वर्षी जागरण गोंधळ करून मंदिर वर्धापन सोहळा साजरा करण्याची प्रथा रामनाथबाबा कोते यांनी सुरु केली आहे.नुकत्याच पार पडलेल्या भाऊबिज उत्सव मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले यासंर्दभात भाऊबिज मंडळ,खंडोबा देवस्थान ट्रस्ट वाकडी,व वाकडी ग्रामपंचायतच्यावतीने प्रसिध्दी प्रसिद्धीपत्रक काढून भाविकांना तसेच वाघे मंडळीनां आव्हान करण्यात आले आहे

भाऊबिज उत्सवाचे हे ३० वे वर्ष असुन यावर्षी मल्हारी भक्तांना घरी राहून देवाचे नामस्मरण करावे लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकमेव वाकडी येथील खंडेराय मंदिरात एकाच वेळी हजार ते दिड हजार जागरण गोंधळ,जागरण घट समोर मंदिर परिसरात दीपोत्सवाने झगमगटणारा परिसर व येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष या सर्व आनंदी व प्रसन्न वातावरनास यावर्षी वाकडी पंचक्रोशीसह मल्हारी भक्तांना मुकावे लागणार आहे.कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीचा भाऊबिज कार्यक्रम रद्द करुन साध्या पध्दतीने फक्त ५ व्यक्तीच्या उपस्थित पार पडणार आहे. त्यामुळे वाकडी पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातुन येणाऱ्या भाविकांनी व वाघे मंडळींनी घरीच राहून यावर्षीचा उत्सव साजरा करावा रामनाथबाबा कोते यांनी सुरु केलेली ही परंपरा येथून पुढेही अशीच चालु राहील कोरानाचे संकट टळल्यानंतर हा उत्सव अशाच दिमाखात पुन्हा पुढील वर्षी सुरु होईल प्रशासनाचे नियम पाळून यावर्षीसाठी भाविकांनी घरीच रहावे मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहान दत्तात्रय कोते,भाऊबिज उत्सव मंडळ,खंडोबा देवस्थान ट्रस्ट,जय मल्हार प्रेस क्लब,वाकडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.