महाराष्ट्रासह दोन राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा

संपादक-नानासाहेब जवरे

नवी दिल्ली:
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यातच दोन राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घोषणा करण्याचं आयोगानं टाळलं होतं. त्यासाठी आजचा दिवस निवडला आहे.


महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मागील वेळी १२ सप्टेंबर रोजी जाहीर होऊन आचारसंहिताही लागली होती. तुलनेनं यंदा तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर तो क्षण आला आहे. मतदान दिवाळीच्या आधी होणार की नंतर, निवडणूक नेमकी किती टप्प्यांत होणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रश्नांची उत्तरंही आज मिळणार आहेत.

ईव्हीएमद्वारेच मतदान;
ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा लावून धरत निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्याची मागणी देशातील विरोधकांनी केली आहे. मात्र, निवडणुका ईव्हीएमवर घेण्यावर निवडणूक आयोग ठाम आहे. त्यामुळं निवडणूक निकालांनंतरही आरोप-प्रत्यारोप कायम राहणार, असंच चित्र आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.