डाळिंब उत्पादकांना १.३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

डाळिंब उत्पादकांना १.३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २९६ डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मध्ये झालेल्या नैसर्गिक नुकसानीपोटी हवामान आधारित फळपिक विम्याचे १.३५ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षी शेकडो हेक्टर डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती येवून डाळींब बागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.या भरपाईने त्यांना दिलासा मिळणार आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षी शेकडो हेक्टर डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती येवून डाळींब बागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे डाळिंब बागांचे अतोनात नुकसान होवून शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या होत्या. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ होईल यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून मतदार संघातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १.३५ कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून हि रक्कम लवकरच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षी शेकडो हेक्टर डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती येवून डाळींब बागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.या भरपाईने त्यांना दिलासा मिळणार आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षी शेकडो हेक्टर डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती येवून डाळींब बागांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे डाळिंब बागांचे अतोनात नुकसान होवून शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या होत्या. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ होईल यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून मतदार संघातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १.३५ कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून हि रक्कम लवकरच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील वर्षापासून शेतकरी अनंत अडचणींचा सामना करीत आहे. यावर्षी कोरोना संकटाचा फटका हा सर्व घटकांबरोबरच शेती व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात बसला असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपिक विम्याचे १.३५ कोटी मंजूर झाल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.