सरकारच्या”त्या”निर्णयाचे आ.काळेंकडून स्वागत

सरकारच्या”त्या”निर्णयाचे आ.काळेंकडून स्वागत

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय-सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

भाजप सरकारच्या काळातच शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप देखील केला होता.आपल्या न्याय मिळावा व आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते.या आंदोलनावेळी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्याला आपल्या जीवाचे बलिदान देखील द्यावे लागले होते.या आंदोलना दरम्यान त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.आता या गुन्ह्यातून त्याची मुक्ती मिळणार आहे.

मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती.या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप देखील केला होता.आपल्या न्याय मिळावा व आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते.या आंदोलनावेळी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्याला आपल्या जीवाचे बलिदान देखील द्यावे लागले होते.या आंदोलना दरम्यान त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.कुणावरही अन्याय झाल्यावर ती व्यक्ती लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारच.आपला हक्क मागण्याचा व त्या विरोधात लढण्याचा तो अधिकार संविधानाने प्रत्येक भारतीयाला बहाल केलेला आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे याबाबत माझा पाठपुरावा सुरु होता.त्यामुळे आंदोलन करणाऱ्या व आंदोलनात सहभागी झालेल्या ज्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्याच्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंत सामाजिक न्याय हक्कासाठी जे काही राजकीय किंवा सामाजिक आंदोलन करण्यात आली. या आंदोलनादरम्यान ज्या-ज्या आंदोलनकर्त्यांवर शासनाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येवून खटले चालविले जात आहे. हे सर्व खटले मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना, नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे या निर्णयाचे आंदोलनकर्त्या शेतकरी व नागरिकांच्या वतीने स्वागत करीत असल्याचे आ. काळे यानी शेवटी म्हटले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.