संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी हे साईबाबांची समाधी असलेले आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून तेथे असलेली गर्दी वर्षभर असल्याच्या बाबीकडे वारंवार लक्षवेधूनही त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या बाबीकडे कोपरगाव येथिल माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी एक जनहित याचिका दाखल करून त्याकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले असून न्यायालयाने शासनाला या बाबत नोटीस काढली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शिर्डी येथे साईबाबा यांनी १९१८ साली समाधी घेतली असून या ठिकाणाला अलीकडील काळात देशविदेश पाळीवर खूप महत्व वाढले आहे.विशेषतः या तीर्थक्षेत्री गुरुवार,शनिवार,रविवार,व सण उत्सव आदी काळात विशेष लाखोंच्या संख्येत गर्दी असते.त्यामुळे हे राष्ट्रीय दर्जाचे देवस्थान बनले आहे.राज्याच्या गृह विभागाने संस्थानला व नगरपंचायतला वारंवार याबाबत नोटीसा बजावून हे तीर्थक्षेत्र अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे बजावले असूनही या कडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
शिर्डी येथे साईबाबा यांनी १९१८ साली समाधी घेतली असून या ठिकाणाला अलीकडील काळात देशविदेश पाळीवर खूप महत्व वाढले आहे.विशेषतः या तीर्थक्षेत्री गुरुवार,शनिवार,रविवार,व सण उत्सव आदी काळात विशेष लाखोंच्या संख्येत गर्दी असते.त्यामुळे हे राष्ट्रीय दर्जाचे देवस्थान बनले आहे.राज्याच्या गृह विभागाने संस्थानला व नगरपंचायतला वारंवार याबाबत नोटीसा बजावून हे तीर्थक्षेत्र अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे बजावले असूनही या कडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यात सुधारणा करणे अगत्याचे आहे. मात्र शासन व स्थानिक प्रशासनाचे ऊक्ती आणि कृतीत जमीन अस्मानचे अंतर पडताना दिसत आहे.म्हणून या कडे कोपरगाव येथील माहिती कार्यकर्ते संजय काळे यांनी नुकतेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून लक्षवेधून घेतले आहे.
या बाबत एका संस्थानच्या एका माजी विश्वस्ताने देखील सी.आय.एस. एफ. ची मागणी केली आहे. याखेरीज शिर्डीत आलेले साईभक्त बेपत्ता होण्याचे प्रमाणही मोठे आहे.या बाबतही धक्कादायक आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे.उच्च न्यायालयाने शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींची मानवी तस्करी होते का या बाबतही जाब विचारलेला आहे.व तपास करण्याचे आदेश दिलेत.मंदीर व परीसरात वाढलेल्या चोऱ्या,पाकीटमारी आदी गुन्हे या मुळे शिर्डी व साईभक्त असुरक्षीत असल्याचे स्पष्ट अहवाल असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.
या अनुषंगाने साई भक्त व शिर्डी व मंदीर परीसर सुरक्षेसाठी संस्थानने मंदीर ,दर्शन रांग, हॉस्पीटल ,प्रसादालय, गोडाऊन, भक्त निवास ,कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणी संस्थानने सी.आय.एस.एफ. सुरक्षा यंत्रणा लागू करावी तसेच मंदीराच्या बाजूला असलेल्या बहूमजली इमारतीच्या मंदीर बाजूचे दारे व खिडक्या बंद करावे सि.सी.टी.व्ही. बसवावे तसेच इमारतींच्या छतावर अनोळखींना जाऊ देऊ नये आदी मागण्यां संजय काळे यांनी उच्च न्यायालयात केल्या आहेत.
त्याची आज सुनावणी होऊन न्यायालयाने केंद्र शासन, राज्य शासन, सी.आय.एस.एफ,शिर्डी नगरपंचायत आदींना नोटीसा काढल्या आहे.याचिका कर्त्याच्यावतीने अॅड. सतिष तळेकर,अॅड. प्रज्ञा तळेकर व अॅड. आजिंक्य काळे यांनी काम पाहीले आहे पुढील सुनावणी चार आठवड्यांनी संपन्न होणार आहे.
Leave a Reply