साठवण तलावावर कालव्याला पाणी मीटर बसवा-संदीप वर्पे

साठवण तलावावर कालव्याला पाणी मीटर बसवा-संदीप वर्पे

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या साठवण तलावात नाशिक जलसंपदाकडून जे पिण्याचे पाणी घेतले जाते ते मोजून घेण्यासाठी व नागरिकांना पालिका हद्दीत पुरविण्यासाठी अशा दोन्ही ठिकाणी मीटर बसविण्याची महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या एका बैठकीत केली आहे.

या सभेत संदीप वर्पे यांनी यावेळी मोठे भांडवल गुंतवून उभारलेल्या बाबूलालशेठ वाणी फ्रुट मार्केटचा लिलावाविना पडून असलेल्या व्यापारी संकुलाचा महत्वपूर्ण प्रश्न छेडला आहे.व त्याची वाढवलेली अंदाजपत्रकीय किंमत कमी करण्यासाठी समोरील ओट्याची किंमत कमी करण्याचा सल्ला दिला आहे.रेडी रेकणरचा विचार न करता या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे कमी करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्याची मागणी लावून धरली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेची नुकतीच अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी यू.डी.आय.एस.अंतर्गत कामे मंजूर करण्यासाठी व त्यावर झालेला खर्च तपशीलवार चर्चा चर्चा सुरु असताना त्यांनी हि महत्वपूर्ण मागणी केली आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना आणि जलसंपदाकडून पिण्याच्या वापरासाठी घेत असलेल्या पाण्याला कुठे पाय फुटतात व आलेले पाणी अद्याप कोठे जाते याचा हिशेबच लागत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वर्षभर झुलत बसण्याचा अनास्था प्रसंग ओढवत असल्याने त्यांच्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे.या पिण्याचा व शेती सिंचनाच्या पाण्यावर कोपरगाव शहरात आणि तालुक्यात मोठे राजकारण घडले आहे.अनेकांना आपल्या नको त्या हट्टासाठी विधानसभेवर तीन चूळ पाणी सोडावे लागले आहे.विधानसभा निवडणुकी नंतर मात्र निवडून आलेले आ. आशुतोष काळे यांनी तीन प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित केले असून त्यात कोपरगाव साठवण तलावाचा प्रश्न वरच्या क्रमांकावर असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सुमारे बावीस एकर क्षेत्रावरील राजकारणाच्या गतिरोधकात अडकलेले पाणी मोकळे करण्यासाठी चंग बांधून ते काम राष्ट्रवादीचे शिर्षस्थ नेते खा.शरद पवार यांच्याशी संपर्क साधून मोठ्या वेगाने सुरु केले आहे.

दरम्यान या सभेत संदीप वर्पे यांनी यावेळी मोठे भांडवल गुंतवून उभारलेल्या बाबूलालशेठ वाणी फ्रुट मार्केटचा लिलावाविना पडून असलेल्या व्यापारी संकुलाचा महत्वपूर्ण प्रश्न छेडला आहे.व त्याची वाढवलेली अंदाजपत्रकीय किंमत कमी करण्यासाठी समोरील ओट्याची किंमत कमी करण्याचा सल्ला दिला आहे.रेडी रेकणरचा विचार न करता या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे कमी करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्याची मागणी लावून धरली आहे.भाडे जास्त असल्याने ते कोणीच घेत नाही हि बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत गुंतवलेले भांडवल वाया जात असल्याची बाब उपस्थितांचे लक्षात आणून दिली आहे.त्यावर कोपरगाव पालिकेचे बांधकाम अभियंता डी.एस.वाघ यांनी त्यास नकार देत अंदाजपत्रकात रेडिरेकणरचा दर समावेश करावाच लागतो ओट्याचे मूल्य कमी करण्यास नकार दिला आहे व तसे करता येत नसल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.