..तो अपहरण केलेला मुलगा अखेर सापडला !

..तो अपहरण केलेला मुलगा अखेर सापडला !

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातिल रहिवाशी असलेल्या व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेचा अल्पवयीन मुलगा विशाल रमेश भाकरे (वय-१५) हा सोमवार दि.०३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या दरम्यान कोपरगाव बेट येथून अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध नुकताच मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय-३५) यांनी गुन्हा दाखल केला होता.मात्र आज मोठ्या पुलानजीक तो मासे पकडणाऱ्या इसमाच्या जाळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिल्याने या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

अपहरीत मुलाच्या आईने आपल्या मुलाला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी तपास करूनही तो मिळून आला नव्हता.या बाबत आज गोदावरी नदीत मासे पकडणाऱ्या इसमांनी नदीत जाळे लावून ठेवलेले असताना त्यांना जाळ्यात अज्ञात वस्तू अडकलेली आढळली त्यांनी त्यास वर काढून पहिले असता त्यांना हादराच बसला.

या बाबत तीन दिवसापूर्वी अपहरीत मुलाच्या आईने आपल्या मुलाला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी तपास करूनही तो मिळून आला नव्हता.या बाबत आज गोदावरी नदीत मासे पकडणाऱ्या इसमांनी नदीत जाळे लावून ठेवलेले असताना त्यांना जाळ्यात अज्ञात वस्तू अडकलेली आढळली त्यांनी त्यास वर काढून पहिले असता त्यांना हादराच बसला त्यांनी हि बाब तत्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास कळवली व त्यानंतर पोलिसानी या बाबत गायब मुलाच्या घरी हि बाब कळवली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ते शव गायब मुलाचेच असल्याचे त्यांनी ओळखले आहे.त्यामुळे या मुलास कोणी अपहरण केले की तो स्वतः नदीत पडला हे समजू शकले नाही.या बाबत पोलीस तपासात हि बाब उघड होईल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

या बाबत तीन दिवसापूर्वी अपहरीत मुलाच्या आईने आपल्या मुलाला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी तपास करूनही तो मिळून आला नव्हता.या बाबत आज गोदावरी नदीत मासे पकडणाऱ्या इसमांनी नदीत जाळे लावून ठेवलेले असताना त्यांना जाळ्यात अज्ञात वस्तू अडकलेली आढळली त्यांनी त्यास वर काढून पहिले असता त्यांना हादराच बसला त्यांनी हि बाब तत्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास कळवली व त्यानंतर पोलिसानी या बाबत गायब मुलाच्या घरी हि बाब कळवली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ते शव गायब मुलाचेच असल्याचे त्यांनी ओळखले आहे.त्यामुळे या मुलास कोणी अपहरण केले की तो स्वतः नदीत पडला हे समजू शकले नाही.या बाबत पोलीस तपासात हि बाब उघड होईल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.