कोपरगावात आजही बाधित रुग्णांची मोठी वाढ

कोपरगावात आजही बाधित रुग्णांची मोठी वाढ

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १४ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या ९८ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये २६ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ७२ संशयीतांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर ३९ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून नगर येथील तपासणीत ११स्राव पाठविण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७६२ इतकी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर काल एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८३ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ५७२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १४ हजार २८८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.३३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ५७२ इतकी झाली आहे.आज बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा दर दीडपट झाला आहे.हि समाधानाची बाब आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार २०४ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३३ लाख १४ हजार ९५३ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६० हजार ६५२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख १८ हजार ७११ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २३ हजार ०८९ वर जाऊन पोहचला आहे.तर नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १७ हजार ८९६ वर गेला आहे.तर जिल्ह्यात २६३ बाधित रुग्णांचे निधन झाले आहे.या शिवाय कोपरगाव तालुक्यात आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७६२ वर गेली असून १४ जणांचा मृत्यू या साथीने झाला आहे.आता तालुका प्रशासनाने चार दिवसांची टाळेबंदी जाहीर केल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आज आढळलेल्या बाधित रुग्णांत शहरातील २० रुग्ण असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील ०६ असे एकूण कोरोना बाधित रुग्ण २६ आढळले आहे.आदी २६ रुग्णाचा समावेश आहे.त्यात सुभद्रानगर येथील तीन रुग्ण त्यात पुरुष (वय-५८,४७,) तर एक महिला (वय-५२),गांधीनगर येथील दोन रुग्ण एक पुरुष (वय-४२) तर महिला (वय-४०),निवारा एक महिला (वय-५२),बागुल टॉवर तीन रुग्ण त्यात एक पुरुष (वय-२१) तर दोन महिला (वय-२४,४६,) समतानगर तीन पुरुष (वय-६५,५६,३४) तर ब्राह्मण गल्ली एक पुरुष (वय-४५), शंकरनगर येथील एक पुरुष (वय-४४), पोलीस कॉलनी येथील एक महिला (वय-२०),टिळकनगर येथे एक पुरुष (वय-६२),हनुमाननगर येथे एक पुरुष (वय-४५),इंदिरापथ येथे पुरुष (वय-४९),गोरोबा नगर येथे एक पुरुष (वय-३९), असे शहरात एकूण वीस बाधित रुग्ण आढळले आहे.

या शिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागात धारणगाव येथे एक पुरुष (वय-५४), पोहेगाव येथे एक मुलगी (वय-१४),तर शिंगणापूर येथे एक महिला बाधित (वय-७०),धामोरी येथील एक महिला (वय-६९),लौकी एक मुलगी (वय-१४) तर कुंभारी येथील एक तरुण (वय-३२) आदी सहा जणांचा समावेश असून शहर व ग्रामीण मिळून २६ रुग्ण बाधित निघाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात २० तर ग्रामीण भागात ०६ असे २६ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आज २६ बाधित रुग्णापेक्षा आज बरे होण्याच्या रुग्णांचा ३९ वर जाऊन दीडपट वाढला असून हि समाधान कारक बातमी मानली जात आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.